पाणी वाचवा

पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्ट्या खेड्यातील हाल पहायलाच नकोत. ति्थे तर  टॅंकरने पाणी आणलेलेही पुरत नाही.
ही टंचाई दूर करण्याचे काम सरकार जरी करत असेल तरी आपलेही काही कर्तव्य आहे की नाही. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
आपली उपनिषधे सांगतात, दुसर्‍याचे काहीही घेऊ नये, कारण ही सृष्टी परमेश्वराच्या मालकीची आहे, आणि आपण आपल्या गरजेइतकाच भाग घ्यावा. कारण ह्या जगातील सर्व सर्वांसाठी आहे आणि ते देवाने सर्वासाठी निर्माण केले आहे. निसर्गाची नासाडी थांबवणे आता आपल्या हातात आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे, त्या तापमान वाढीला आपण हातभार न लावणेच बरे.  नाही का? पाण्यावरच हे सृष्टीचे चक्र फिरत आहे, आपण पाण्याशिवाय पॄथ्वीची कल्पनाही करू शकत नाही. सगळे मोठमोठे देश पाण्यासारखा पैसा खर्च करून परग्रहावर फेर्‍या मारताहेत, पण फक्त पाणी नाही म्हणून हतबल आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातही थोडा विचार करून, योग्य नियोजन करून, पाण्याचा दुरूपयोग टाळू शकतो. पण त्यासाठी काय केले पाहिजे -
पाण्याखाली घागर किंवा कोणतेही भांडे ठेवले तरी ते वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खूपजण दात घासताना बेसिनचा नळा उघडाच ठेवतात, त्याचा काय फायदा माहित नाही?. काहीजणांना शॉवरखाली आंघोळ करण्याची भारी हौस असते, अगदी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती पाणी वाया घालवतो ते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात, त्यापेक्षा हॉटेल मध्ये छोट्या ग्लासात पाणी दिल्यास वाया जाणार नाही, पण का्ळजी कोण घेतो. खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी मारतात, त्याचा काय फायदा ते एक तो दुकानदारच जाणो. आम्ही रोज सकाळी जाताना पाहतो स्वारगेटला एका छोट्याशा मंदिरासमोर असा भला मोठा पाईप घेऊन रोज पाणी मारतात, एवढे की पाण्याचे पाट वाहू लागतात, त्याला एकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याने सुनावले, आम्ही तुमच्या घरचे पाणी वापरतो काय? हे तर सरकारचे पाणी आहे. मोठमोठया सोसायटीत टाक्या भरून वाहतात पण एक बॉल कॉक बसविल्यास पाणी वाहणार नाही, थोड्याशा विचाराने, एका बॉलकॉकने आपण किती पाण्याची बचत करू शकतो, हे सांगून पटणार नाही.
खरे तर पाणी वाचविण्यावी मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनः वापर करता आला पाहिजे.
यासाठी कायदा करून काही उपयोग होणार नाही.

Unknown

4 comments:

Unknown said...

thanxxxxxxxxx.........u saved my project

Anonymous said...

good information

Unknown said...

Very good information and my speech of pani vachva was excellent

Unknown said...

Good onformation and my speech on pani vachva was excellent.